Skip to main content

अभियंत्यांनी कल्पनाशक्तीला वाव देऊन भविष्याचा वेध घ्यावा:आय ए एस रवींद्र खताळ



बेल्हे(जुन्नरवार्ता)सुधाकर सैद-   समर्थ संकुलात भारतातील प्रख्यात स्थापत्य अभियंता भारतरत्न सर डॉ.विश्‍वेश्‍वरय्या मोक्षगुंडम यांचा जन्मदिन 'इंजिनियर्स डे' म्हणून साजरा करण्यात आला.
याप्रसंगी सर डॉ.मोक्षगुंडम् विश्‍वेश्‍वरय्या यांच्या प्रतिमेस पुष्पहार व फुले अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी अभियांत्रिकी चे प्राचार्य डॉ.अनिल पाटील,बी सी एस चे प्राचार्य डॉ.लक्ष्मण घोलप,एम बी ए चे प्राचार्य राजीव सावंत,फार्मसी चे प्राचार्य डॉ.संतोष घुले,डॉ.सुभाष कुंभार,पॉलिटेक्निक चे प्राचार्य अनिल कपिले,आय टी आय चे प्राचार्य पांडुरंग हाडवळे तसेच संकुलातील सर्व विभागप्रमुख ,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने या वेबिनारसाठी ऑनलाईन सहभागी झाले होते.
गुजरात मधील जिल्ह्याचे कलेक्टर रवींद्र खताळ यांचे इंजिनिअर्स डे निमित्त ऑनलाईन वेबिनार आयोजित करण्यात आले होते.
सर्वसामान्य कुटुंबातून मेकॅनिकल इंजिनिअरिंग ची पदवी घेऊन महाराष्ट्र राज्य सेवा आयोगाच्या परीक्षेमार्फत आय ए एस अधिकारी म्हणून गुजरात येथे कार्यरत असणारे रवींद्र खताळ यांनी यावेळी आपला जीवनपट सर्वांसमोर कथन केला.विद्यार्थ्यांशी चर्चात्मक संवाद साधताना रवींद्र खताळ म्हणाले की,मी स्वतः एक इंजिनिअर आहे.इंजिनिअरच्या कामामध्ये लवचिकता,प्रत्येक गोष्ट जुळवून घेण्याची क्षमता व कला,ऐनवेळचे व्यवस्थापन इ बाबी अंतर्भूत असतात.आय ए एस अधिकारी होण्याआधी रवींद्र खताळ हे एका खाजगी कंपनीत काम करत होते.परंतु स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली, त्यादृष्टीने प्रयत्न केला आणि विचार केला की धोका पत्करून पाहू.परीक्षा पास होऊ शकतो असा आत्मविश्वास आल्यानंतर कंपनीमध्ये राजीनामा दिला.या क्षेत्रात प्रत्येक दिवस वेगळा,विषय वेगळा,समस्या वेगळा आणि आव्हानात्मक असतो.विद्यार्थी दशेत असताना विशेषकरून इंजिनिअरिंग अभ्यासक्रम शिकताना विद्यार्थ्यांनी जिज्ञासू वृत्तीने शिक्षण घेतले पाहिजे.सामाजिक भान असले पाहिजे.वेगवेगळे प्रश्न विचारले पाहिजेत.त्यासाठी अभियंत्यांनी कल्पनाशक्तीला वाव देऊन भविष्याचा वेध घ्यावा.ही सर्व खासियत मुळातच इंजिनिअर मध्ये असते,गरज आहे ती योग्य मार्गदर्शनाची आणि कठोर परिश्रमाची.फावल्या वेळेत आपण काय करतो यावर भविष्यातील बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात.
अविरत परिश्रम,कडक शिस्त,कामावर निष्ठा यातून यशाची शिखरे पादाक्रांत करता येतात याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे भारतरत्न सर डॉ.मोक्षगुंडम् विश्‍वेश्‍वरय्या असे उद्गार यावेळी रवींद्र खताळ यांनी काढले.मन,मेंदू आणि मनगट या तिन्हींचा चांगला मेळ घालून तरुणातील कौशल्य विकसित झाली पाहिजे.यानंतर विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची समर्पक उत्तरे देऊन त्यांच्या शंकाचे निरसन केले.
ऑनलाईन वेबिनारचे नियोजन प्रा.भूषण बोऱ्हाडे यांनी तर डॉ.अनिल पाटील यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.
आजच्या या अभियंता दिनाच्या निमित्ताने प्राचार्य राजीव सावंत यांच्या हस्ते संकुलामध्ये वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,डॉ.महेश भास्कर,प्रा.रुस्तुम दराडे,प्रा.शशिकांत ताजने आदी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

ग्रामीण विद्यार्थ्यांना वरदान ठरतेय बेल्हे येथील समर्थ शैक्षणिक संकुल.

बेल्हे(जुन्नरवार्ता सुधाकर सैद)   येथील समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे (बांगरवाडी) येथील इंजिनिअरिंग,डिप्लोमा,बी सी एस या महाविद्यालयातील ४० विद्यार्थ्यांची विविध नामांकित व बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड झाल्याची माहिती संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके यांनी दिली. ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागाच्या वतीने घेतल्या गेलेल्या कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये अभियांत्रिकी विभागातील १३ विद्यार्थ्यांची,पॉलिटेक्निक मधील २३ तर बी सी एस मधील ४ विद्यार्थ्यांची विविध नामांकित व बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड झाली. समर्थ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभाग आशिष फुलवडे-रिव्हेचर या कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून ५ लाखाचे पॅकेज,शितल पाचारणे या विद्यार्थिनीची पुणे येथील व्हर्च्युसा कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून निवड झाली.त्यामध्ये तिला *४.५ लाखाचे पॅकेज मिळाले, सिद्धेश साळुंके-अकसेंचर या कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून ४.५ लाखाचे पॅकेज,दिपक गाढवे -बजाज फायनान्स मध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून ३ लाखाचे पॅकेज,प्रकाश नवले या विद्यार्थ्याची...

नटरंगी नार सुरेखा पुणेकरांच्या अदाकारीने प्रेक्षक मंत्रमुग्ध

बेल्हे(वार्ताहर) कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षापासून तमाशा फडांचे मालक व कलाकार देशोधडीला लागले असून प्रशासनाने बंदी ऊठविल्यानंतर(दि.२६/२७ नोव्हेंबर)  बेल्हे येथे कै. संगितरत्न दत्ता महाडिक पुणेकर तमाशा महोत्सवाच्या माध्यमातून साईकृपा पतसंस्थेचे अध्यक्ष वसंत जगताप व त्यांच्या सहका-यांनी त्यांना सावरण्यासाठी मदतीचा हात पुढे केला व दोन दिवस आठ तमाशा फड मालकांनी आपली कला सादर केली व दुसऱ्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रासह परदेशातही आपल्या लावणीच्या माध्यमातून मराठी ठसक्याचा ठसा उमटवणारी,आपल्या अदाकारीने भल्याभल्यांच्या टोप्या उडवणारी लावणीसम्राज्ञी नटरंगी नार सुरेखा पुणेकर यांच्या बहारदार लावणीचा आस्वाद घेण्यासाठी बेल्हेकरांसह पुणे,अहमदनगर,मुंबईवरुन खास ढोलकीच्या तालावर आणि घुंगराच्या बोलावर रंगलेली लावणी पाहण्यासाठी रसिक व दर्दी प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.श्री बेल्हेश्वर यात्रेच्या निमित्ताने भरणा-या तमाशा महोत्सवाचा दुसरा दिवस हा पुणेकर यांच्या लावणीमुळे चांगलाच बहरला होता.कार्यक्रमाची सुरूवात झाल्यावर पुणेकर यांच्या बैठकीच्या लावणीला त्यांनी केलेल्य...

समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्सला महाराष्ट्र शासनाची मान्यता

*समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्सला महाराष्ट्र शासनाची मान्यता प्राप्त* समर्थ रूरल एजुकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ शैक्षणिक संकुलमध्ये शैक्षणिक वर्ष २०२१-२२ पासून महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या अखत्यारीत असलेला व्यवसायाभिमुख पदवीचा अभ्यासक्रम ए डी एम एल टी म्हणजेच ऍडव्हान्स डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी हा सुरू करण्यास महाराष्ट्र शासनाने नुकतीच मान्यता प्रदान केली असल्याची माहिती संस्थेचे सचिव विवेक शेळके यांनी दिली. सदर अभ्यासक्रम महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मान्यता प्राप्त उत्तर पुणे जिल्ह्यातील एकमेव असणार आहे.या अभ्यासक्रमाची प्रवेश पात्रता बी एस्सी केमिस्ट्री,झुलॉजी,बॉटनी,(गणित व भौतिकशास्त्र सोडून बाकीचे),बी एस्सी फिजिओथेरपी,बी फार्मसी,बी व्ही एस्सी सी,बी ए एम एस,बी यु एम एस,एम बी बी एस,डी एच एम एस किंवा समकक्ष अभ्यासक्रम पूर्ण केलेले विद्यार्थी या अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ शकतात.हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर रक्त,लघवी तपासणी प्रयोगशाळा सुरू करण्यासाठी नोंदणीकृत परवाना प्राप्त होतो.प्रयोगशाळा पर्यवेक्षक,सहाय्यक,तंत्रज्ञ म्हणून काम करण...