बेल्हे(जुन्नरवार्ता सुधाकर सैद)राजुरी परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा धुमाकूळ सुरु होता या बिबट्याने अनेक पाळीव प्राण्यांवर हल्ले केले होते एव्हढेच नाही तर काही दिवसां पूर्वी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घराच्या अंगणात खेळणाऱ्या बालकावरही हल्ला करुन गंभीर जखमी केले होते बिबट्याच्या वारंवार घडणाऱ्या हल्ल्यांमुळे येथील नागरीकांधुन भीतीचे वातावरण होते त्यामुळे या ठिकाणी पिंजरा लावावा अशी मागणी राजुरी येथील ग्रामस्थांनी केली होती या मागणीवरून वनखात्याने शुक्रवारी रात्री नऊ वाजता येथील शेतकरी सुदाम खंडू हाडवळे यांच्या शेतात पिंजरा लावला होता त्यानंतर अवघ्या एक तासातच हा बिबट्या वनखात्याने लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाला यासाठी वनखात्याचे अधिकारी आदर्श जगताप व वनकर्मचारी स्वप्निल हाडवळे यांचे विशेष सहकार्य लाभले असून आज(दि.१९)
रोजी दुसरा बिबट्या वनखात्याच्या पिंज-यात अडकला असून अजुनही राजुरीच्या या भागात ३/४ बिबट्यांचा वावर असल्याचे स्थानिक रहिवाशांनी सांगितले.
Comments
Post a Comment