Skip to main content

नवनवीन उद्भवणा-या समस्या,रोग,आजार यावर उपाय शोधत कार्यरत राहणे म्हणजे एक प्रकारची देशसेवाच-डाॕ.सदानंद राऊत

बेल्हे(जुन्नरवार्ता सुधाकर सैद)   समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी व समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी,बेल्हे (बांगरवाडी) यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच फार्मासिस्ट डे साजरा करण्यात आला.
धन्वंतरीच्या प्रतिमेस पुष्पहार व फुले अर्पण करण्यात आली.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून नारायणगाव येथील विघ्नहर नर्सिंग होम व जुन्नर तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन चे माजी अध्यक्ष व सर्पतज्ञ डॉ.सदानंद राऊत,संस्थेचे उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,प्रा.राजीव सावंत,समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.संतोष घुले,समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.सुभाष कुंभार आदी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना फार्मासिस्ट डे च्या निमित्ताने ऑनलाईन मार्गदर्शन करताना डॉ.सदानंद राऊत म्हणाले की,मेडिकल क्षेत्रात एक फार्मासिस्ट म्हणून डिप्लोमा किंवा पदवी मिळवलेल्या प्रत्येकाचीच फार महत्वाची भूमिका असते.कुठले औषध कशावर घ्यायचे व किती प्रमाणात घ्यायचे त्याचबरोबर त्याचे साईड इफेक्ट काय असतील याचे ज्ञान असणे गरजेचे आहे.औषधे,गोळ्या,प्रिस्क्रिप्शन,औषधासंदर्भात समुपदेशन,आजाराविषयी मनमोकळी सल्लामसलत,रक्तदाब,रक्तशर्करा यांचे प्रमाण तसेच चुकीच्या औषधामुळे किंवा डॉक्टर,फार्मासिस्ट यांना न विचारता घेतलेल्या गोळ्या औषधांमुळे होणारे दुष्परिणाम याबाबत सखोल मार्गदर्शन केले.वेगवेगळ्या आजारापासून कसे वाचता येईल त्याची लक्षणे कशी ओळखायची त्याचप्रमाणे गोळ्या औषधांची वैधता संपल्यानंतर वापरात आणू नये इत्यादी विषयी माहिती दिली.
जागतिक फार्मसिस्ट दिनाच्या निमित्ताने या क्षेत्राला भेडसावणारे प्रश्न व ते सोडवण्यासाठी कोणत्या उपाययोजना करणे शक्य आहे याचा विचार विद्यार्थीदशेत असतानाच करणे अत्यंत महत्वाचे आहे.डॉक्टर आणि रुग्ण यांच्यामधील दुवा म्हणजे फार्मासिस्ट.फार्मसिस्ट हा एक रुग्णाभिमुख व्यावसायिक असून योग्य ते मार्गदर्शन करणे ही त्याची जबाबदारी आहे.औषध व्यवसाय हा सुनियंत्रित आहे, जबाबदारीचा आहे, यातील चुका म्हणजे रुग्णाच्या जिवाशीच खेळ आहे.या व्यवसायाचा केंद्रबिंदू औषधे नसून रुग्ण आहे.शिक्षणाचा दर्जा, काळानुरूप अभ्यासक्रम, त्यात रुग्णाभिमुख दृष्टिकोन येणे आवश्यक आहे.
औषधनिर्माणशास्त्र हे क्षेत्र फार व्यापक असून विद्यार्थ्यांना या क्षेत्रात संशोधनाच्या भरपूर संधी आहेत.संशोधन करण्यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना प्रवृत्त करावे.ज्या विषयावर कुठलेच संशोधन आत्तापर्यंत झालेले नाही त्यावर तुम्ही काम करा.त्यात खूप वाव आहे.नवनवीन उद्भवणाऱ्या समस्या,रोग,आजार व  त्यावरचे उपाय शोधण्यासाठी संशोधनाच्या माध्यमातून सतत कार्यरत राहणे म्हणजे एक प्रकारची देशसेवाच आहे असे यावेळी डॉ.राऊत म्हणाले.
फार्मासिस्ट डे च्या सर्वांना शुभेच्छा देण्यात आल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.प्रदीप गाडेकर,प्रास्ताविक डॉ.सुभाष कुंभार यांनी तर आभार डॉ.संतोष घुले यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

ग्रामीण विद्यार्थ्यांना वरदान ठरतेय बेल्हे येथील समर्थ शैक्षणिक संकुल.

बेल्हे(जुन्नरवार्ता सुधाकर सैद)   येथील समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे (बांगरवाडी) येथील इंजिनिअरिंग,डिप्लोमा,बी सी एस या महाविद्यालयातील ४० विद्यार्थ्यांची विविध नामांकित व बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड झाल्याची माहिती संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके यांनी दिली. ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागाच्या वतीने घेतल्या गेलेल्या कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये अभियांत्रिकी विभागातील १३ विद्यार्थ्यांची,पॉलिटेक्निक मधील २३ तर बी सी एस मधील ४ विद्यार्थ्यांची विविध नामांकित व बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड झाली. समर्थ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभाग आशिष फुलवडे-रिव्हेचर या कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून ५ लाखाचे पॅकेज,शितल पाचारणे या विद्यार्थिनीची पुणे येथील व्हर्च्युसा कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून निवड झाली.त्यामध्ये तिला *४.५ लाखाचे पॅकेज मिळाले, सिद्धेश साळुंके-अकसेंचर या कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून ४.५ लाखाचे पॅकेज,दिपक गाढवे -बजाज फायनान्स मध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून ३ लाखाचे पॅकेज,प्रकाश नवले या विद्यार्थ्याची...

नटरंगी नार सुरेखा पुणेकरांच्या अदाकारीने प्रेक्षक मंत्रमुग्ध

बेल्हे(वार्ताहर) कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षापासून तमाशा फडांचे मालक व कलाकार देशोधडीला लागले असून प्रशासनाने बंदी ऊठविल्यानंतर(दि.२६/२७ नोव्हेंबर)  बेल्हे येथे कै. संगितरत्न दत्ता महाडिक पुणेकर तमाशा महोत्सवाच्या माध्यमातून साईकृपा पतसंस्थेचे अध्यक्ष वसंत जगताप व त्यांच्या सहका-यांनी त्यांना सावरण्यासाठी मदतीचा हात पुढे केला व दोन दिवस आठ तमाशा फड मालकांनी आपली कला सादर केली व दुसऱ्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रासह परदेशातही आपल्या लावणीच्या माध्यमातून मराठी ठसक्याचा ठसा उमटवणारी,आपल्या अदाकारीने भल्याभल्यांच्या टोप्या उडवणारी लावणीसम्राज्ञी नटरंगी नार सुरेखा पुणेकर यांच्या बहारदार लावणीचा आस्वाद घेण्यासाठी बेल्हेकरांसह पुणे,अहमदनगर,मुंबईवरुन खास ढोलकीच्या तालावर आणि घुंगराच्या बोलावर रंगलेली लावणी पाहण्यासाठी रसिक व दर्दी प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.श्री बेल्हेश्वर यात्रेच्या निमित्ताने भरणा-या तमाशा महोत्सवाचा दुसरा दिवस हा पुणेकर यांच्या लावणीमुळे चांगलाच बहरला होता.कार्यक्रमाची सुरूवात झाल्यावर पुणेकर यांच्या बैठकीच्या लावणीला त्यांनी केलेल्य...

समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्सला महाराष्ट्र शासनाची मान्यता

*समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्सला महाराष्ट्र शासनाची मान्यता प्राप्त* समर्थ रूरल एजुकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ शैक्षणिक संकुलमध्ये शैक्षणिक वर्ष २०२१-२२ पासून महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या अखत्यारीत असलेला व्यवसायाभिमुख पदवीचा अभ्यासक्रम ए डी एम एल टी म्हणजेच ऍडव्हान्स डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी हा सुरू करण्यास महाराष्ट्र शासनाने नुकतीच मान्यता प्रदान केली असल्याची माहिती संस्थेचे सचिव विवेक शेळके यांनी दिली. सदर अभ्यासक्रम महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मान्यता प्राप्त उत्तर पुणे जिल्ह्यातील एकमेव असणार आहे.या अभ्यासक्रमाची प्रवेश पात्रता बी एस्सी केमिस्ट्री,झुलॉजी,बॉटनी,(गणित व भौतिकशास्त्र सोडून बाकीचे),बी एस्सी फिजिओथेरपी,बी फार्मसी,बी व्ही एस्सी सी,बी ए एम एस,बी यु एम एस,एम बी बी एस,डी एच एम एस किंवा समकक्ष अभ्यासक्रम पूर्ण केलेले विद्यार्थी या अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ शकतात.हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर रक्त,लघवी तपासणी प्रयोगशाळा सुरू करण्यासाठी नोंदणीकृत परवाना प्राप्त होतो.प्रयोगशाळा पर्यवेक्षक,सहाय्यक,तंत्रज्ञ म्हणून काम करण...