Skip to main content

भारतीय परंपरेनुसार समर्थ शैक्षणिक संकुलात खंडेनवमी साजरी.


बेल्हे(जुन्नरवार्ता सुधाकर सैद) समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्युट राजुरी संचलित समर्थ शैक्षणिक संकुल,बेल्हे येथे शारदीय नवरात्रौत्सव व खंडेनवमीनिमित्त यंत्र पूजन करण्यात आले.
संस्थेचे सचिव विवेक शेळके यांच्या शुभहस्ते दिप प्रज्वलन,सरस्वती पूजन व यंत्र पूजन करून खंडेनवमी साजरी करण्यात आली.यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष माऊली शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,समर्थ अभियांत्रिकी चे प्राचार्य डॉ.अनिल पाटील,एम बी ए चे प्राचार्य प्रा.राजीव सावंत,बी सी एस चे प्राचार्य डॉ.लक्ष्मण घोलप,आय टी आय चे प्राचार्य पांडुरंग हाडवळे,पॉलिटेक्निक चे प्राचार्य अनिल कपिले,फार्मसी चे प्राचार्य डॉ.संतोष घुले,डॉ.सुभाष कुंभार,गुरुकुलचे प्राचार्य सतीश कुऱ्हे,प्रा.संजय कंधारे,प्रा.नंदकिशोर मुऱ्हेकर,गौरव शेठ घंगाळे,संतोष खुटाळ,रवी गाडगे,आदी मान्यवर उपस्थित होते.
भारतीय धर्मपरंपरेनुसार नऊ दिवसांचा नवरात्र उत्सव पूर्ण होतो.खंडे नवमीला शस्र पूजन व यंत्र पूजन केले जाते.समर्थ संकुलात प्रतिवर्षीप्रमाणे कार्यशाळा,प्रयोगशाळा,ट्रेनिंग सेंटर आदींमध्ये असणाऱ्या विविध साधन सामग्री,उपकरणे,औजारे पूजन आज करण्यात आले.समर्थ संकुलात तांत्रिक शिक्षण व कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम उपलब्ध असल्याने यंत्र,औजारे,प्रयोगशाळेतील साहित्य,उपकरणे यांच्याशी विद्यार्थ्यांचा नेहमीच संपर्क येत असतो.अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी ज्या क्षेत्रामध्ये काम करणार आहेत त्या सर्वच क्षेत्रामध्ये ही यंत्र,अवजारे,साहित्य त्यांच्या सोबत असणार आहेत.पूर्वीच्या काळी ज्याप्रमाणे शस्त्रपूजन मोठ्या प्रमाणात व्हायचे त्याप्रमाणेच आजही आधुनिक काळात या यंत्रांचे पूजन करून त्या जोरावर कौशल्ये अधिकाधिक आत्मसात करून उत्कर्ष साधण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे.
सर्व उपस्थित शिक्षकांनी व मान्यवरांनी यावेळी संकुलातील प्रयोगशाळा साहित्य उपकरणे,यंत्र,अवजारे यांची पूजा केली.
आय टी आय चे प्राचार्य पांडुरंग हाडवळे म्हणाले की,यंत्र ही साधना असून यंत्राचे तंत्र लक्षात घेऊन फक्त आजच्याच दिवशी नाही तर वेळोवेळी या यंत्रांकडे लक्ष देऊन त्याची निगा राखली तर यंत्राचे तंत्र आपल्याला जीवनात एक नवीन मंत्र देऊन जीवन अधिक सुसह्य करण्यात मदत करतील कार्यक्रमाचे नियोजन क्रीडा संचालक डॉ.राजाभाऊ ढोबळे यांनी तर प्रा.प्रदीप गाडेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Comments

Popular posts from this blog

ग्रामीण विद्यार्थ्यांना वरदान ठरतेय बेल्हे येथील समर्थ शैक्षणिक संकुल.

बेल्हे(जुन्नरवार्ता सुधाकर सैद)   येथील समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे (बांगरवाडी) येथील इंजिनिअरिंग,डिप्लोमा,बी सी एस या महाविद्यालयातील ४० विद्यार्थ्यांची विविध नामांकित व बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड झाल्याची माहिती संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके यांनी दिली. ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागाच्या वतीने घेतल्या गेलेल्या कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये अभियांत्रिकी विभागातील १३ विद्यार्थ्यांची,पॉलिटेक्निक मधील २३ तर बी सी एस मधील ४ विद्यार्थ्यांची विविध नामांकित व बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड झाली. समर्थ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभाग आशिष फुलवडे-रिव्हेचर या कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून ५ लाखाचे पॅकेज,शितल पाचारणे या विद्यार्थिनीची पुणे येथील व्हर्च्युसा कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून निवड झाली.त्यामध्ये तिला *४.५ लाखाचे पॅकेज मिळाले, सिद्धेश साळुंके-अकसेंचर या कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून ४.५ लाखाचे पॅकेज,दिपक गाढवे -बजाज फायनान्स मध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून ३ लाखाचे पॅकेज,प्रकाश नवले या विद्यार्थ्याची पुणे येथ

शेळके कुटूंबाने जपला ऐक्याचा वसा आणि वारसा

बेल्हे(वार्ताहर)  समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष वसंतराव शेळके,राजुरी गावचे माजी सरपंच व विद्यमान उपसरपंच माऊली शेळके,जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या स्नेहल शेळके व शेळके परिवाराच्या वतीने मुस्लिम बांधवांसाठी दिवाळी फराळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते,या कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव व गावातील सर्व प्रमुख संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.प्रत्येकवर्षी दिवाळीच्या सणाला सर्व मुस्लिम बांधवांना बोलावून दिवाळी फराळ कार्यक्रमाचे आयोजन त्याचबरोबर प्रमुख मान्यवरांचा सत्कार असे या कार्यक्रमाचे स्वरूप असून राजुरी या गावाला एक ऐतिहासिक अशी वैचारिक बैठक आहे व ती जपण्याचा,जोपासण्याचा आणि प्रचार व प्रसार करण्याचा प्रयत्न हिंदू मुस्लिम या बांधवांना एकत्रित घेऊन या दिवाळी फराळाच्या निमित्ताने शेळके कुटुंबियांमार्फत दरवर्षी केला जातो. युवा नेतृत्व वल्लभ शेळके यांच्या पुढाकाराने साजरा होत असलेला दिवाळी फराळाचा कार्यक्रम म्हणजे खमंग विचारांचा खरपुस नजराणा असून खऱ्या अर्थाने हिंदू मुस्लिम बांधवांचे पूर्वापारपासूनचे एकोप्याचे दर्शन घडवतो तसेच राजुरी गावच्या जडण-घडणी मध्ये श

ऊस ट्रॕक्टर ट्राॕलीला चारचाकीची मागून धडक एक ठार दोन गंभीर

बेल्हे(वार्ताहर) कल्याण-अहमदनगर महामार्गावर गुळूंचवाडी गावच्या हद्दीत उसाच्या ट्रॉलीला इनोव्हा कारने पाठीमागून भरधाव वेगाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार झाला तर दोघे गंभीर जखमी झाले असून हे सर्व जण नगरकडून आळेफाटा येथे जात असताना शुक्रवारी (दि.१९) रात्री आठ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला असून संजय मारुती गगे( रा.नळवणे,ता.जुन्नर) असे अपघातात ठार झालेल्याचे नाव असून योगेश धोंडिबा आहेर, संदीप पोपट शिंदे हे गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत आळेफाटा पोलिसांनी दिलेली अधिकची माहिती अशी की कल्याण-अहमदनगर  महामार्गावर गुळंचवाडी शिवारातून क्रांती शुगर फॅक्टरीकडे जात असलेला ट्रॅक्टर क्रमांक (एम.एच १६ केव्ही ६४८६ ) नंबर नसलेल्या व उसाने भरलेल्या दोन ट्रॉली घेऊन जात होता,त्याच दरम्यान भरधाव वेगाने आळेफाट्याकडे जाणारी इनोव्हा चारचाकी ( एमएच-१९-एपी-८०१०)ट्रॉलीच्या पाठीमागून जाऊन धडकली व जोरदार धडक बसल्याने इनोव्हा चारचाकीचे डाव्या बाजुचे जास्त नुकसान झाले असून धडक इतकी जोराची होती की इनोव्हामधील संजय मारुती गगे जागीच ठार झाले व उर्वरित दोन जखमींना आळेफाटा येथील खाजगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी द