बेल्हे(जुन्नरवार्ता सुधाकर सैद ) येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री.बेल्हेश्वर विद्यालयात श्रीबेल्हेश्वर विकास फाउंडेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी या हेतूने सहावी, सातवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी पासवर्ड वाचन अभियान यावर आधारीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना पुणे जिल्हा परिषदेचे अतिरिक्त कार्यकारी अधिकारी व राष्ट्रीय स्वराज्य ग्राम अभियान पुणेचे संचालक आनंद भंडारी यांनी वाचाल तर वाचाल यातून वाचनाचे महत्त्व सांगितले की ज्याप्रमाणे शरीराच्या वाढीसाठी माणसाला अन्नाची गरज असते त्याप्रमाणे मनाच्या आणि मेंदूला चालना मिळण्यासाठी वाचन गरजेचे आहे.वाचनाने ज्ञानाच्या कक्षा वाढतात,विचारांमध्ये सुसूत्रता येते,वैचारिक उंची वाढण्यास मदत होते,पुस्तक मग ते कोणतेही असो आपल्याला ज्ञान आणि दिशा देते,चांगल्या वाईटाची जाणीव करुन देते, म्हणून प्रत्येकाने वाचन करायला हवे,नवे कोरे करकरीत पुस्तक वाचताना आपला आनंद द्विगुणीत होतो,साहित्य हे आपल्या ज्ञानाची भूक भागविते परंतु आपण त्याचा उपयोग करुन घेत नाही ही फार मोठी खंत आहे.मोबाईल,टिव्ही, फेसबुक, व्हाटसॲप यात आपण एवढे गुंतलो आहोत की हातातील मोबाईल काही केल्या सुटत नाही मग वाचायला वेळ कधी मिळणार ? असे काही जण म्हणतील आम्ही मोबाईलमध्ये वाचत असतो पण पुस्तक वाचनाची मजा काही औरच असते.आजची मुले वाचनापासून दूर जात आहेत त्याचे दुष्परिणाम भविष्यात पहायला मिळतील.आज अनेक घरात एकाच वेळी मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसलेले आईबाबा व मुले दिसून येतात.दहा पंधरा हजाराचा मोबाईल घेताना आज आपण पैशाचा विचार करत नाही पण शंभर दिडशे रुपयांचे पुस्तक घेताना आपण दहावेळा विचार करतो कारण पुस्तकापेक्षा आज मोबाईल महत्त्वाचा वाटतो,मोबाईलही गरजेचा आहे परंतु शंभर/दोनशे रुपयाचे पुस्तक आपल्या मुलांच्या आयुष्यातील एक वेगळे वळण ठरु शकते याचा आपल्याला विसर पडतो,याप्रसंगी जुन्नरचे आमदार अतुल बेनके,रामभाऊ बोरचटे,निलेश धानापुणे,धोंडिभाऊ पिंगट, विश्वनाथ डावखर, सरपंच गोरक्षनाथ वाघ,राजेंद्र गाडगे,सारिका घळसासी,सचिन घोडेस्वार आदी मान्यवर उपस्थित होते.
बेल्हे(जुन्नरवार्ता सुधाकर सैद) येथील समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे (बांगरवाडी) येथील इंजिनिअरिंग,डिप्लोमा,बी सी एस या महाविद्यालयातील ४० विद्यार्थ्यांची विविध नामांकित व बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड झाल्याची माहिती संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके यांनी दिली. ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागाच्या वतीने घेतल्या गेलेल्या कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये अभियांत्रिकी विभागातील १३ विद्यार्थ्यांची,पॉलिटेक्निक मधील २३ तर बी सी एस मधील ४ विद्यार्थ्यांची विविध नामांकित व बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड झाली. समर्थ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभाग आशिष फुलवडे-रिव्हेचर या कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून ५ लाखाचे पॅकेज,शितल पाचारणे या विद्यार्थिनीची पुणे येथील व्हर्च्युसा कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून निवड झाली.त्यामध्ये तिला *४.५ लाखाचे पॅकेज मिळाले, सिद्धेश साळुंके-अकसेंचर या कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून ४.५ लाखाचे पॅकेज,दिपक गाढवे -बजाज फायनान्स मध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून ३ लाखाचे पॅकेज,प्रकाश नवले या विद्यार्थ्याची पुणे येथ
Comments
Post a Comment