Skip to main content

श्रीबेल्हेश्वर विद्यालयात पासवर्ड वाचन अभियान

बेल्हे(जुन्नरवार्ता सुधाकर सैद ) येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री.बेल्हेश्वर विद्यालयात श्रीबेल्हेश्वर विकास फाउंडेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी या हेतूने सहावी, सातवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी पासवर्ड वाचन अभियान यावर आधारीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना पुणे जिल्हा परिषदेचे अतिरिक्त कार्यकारी अधिकारी व राष्ट्रीय स्वराज्य ग्राम अभियान पुणेचे संचालक आनंद भंडारी यांनी वाचाल तर वाचाल यातून वाचनाचे महत्त्व   सांगितले की ज्याप्रमाणे शरीराच्या वाढीसाठी माणसाला अन्नाची गरज असते त्याप्रमाणे मनाच्या आणि मेंदूला चालना मिळण्यासाठी वाचन गरजेचे आहे.वाचनाने ज्ञानाच्या कक्षा वाढतात,विचारांमध्ये सुसूत्रता येते,वैचारिक उंची वाढण्यास मदत होते,पुस्तक मग ते कोणतेही असो आपल्याला ज्ञान आणि दिशा देते,चांगल्या वाईटाची जाणीव करुन देते, म्हणून प्रत्येकाने वाचन करायला हवे,नवे कोरे करकरीत पुस्तक वाचताना आपला आनंद द्विगुणीत होतो,साहित्य हे आपल्या ज्ञानाची भूक भागविते परंतु आपण त्याचा उपयोग करुन घेत नाही ही फार मोठी खंत आहे.मोबाईल,टिव्ही, फेसबुक, व्हाटसॲप यात आपण एवढे गुंतलो आहोत की हातातील मोबाईल काही केल्या सुटत नाही मग वाचायला वेळ कधी मिळणार ? असे काही जण म्हणतील आम्ही मोबाईलमध्ये वाचत असतो पण  पुस्तक वाचनाची मजा काही औरच असते.आजची मुले वाचनापासून दूर जात आहेत त्याचे दुष्परिणाम भविष्यात पहायला मिळतील.आज अनेक घरात एकाच वेळी मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसलेले आईबाबा व मुले दिसून येतात.दहा पंधरा हजाराचा मोबाईल घेताना आज आपण पैशाचा विचार करत नाही पण शंभर दिडशे रुपयांचे पुस्तक घेताना आपण दहावेळा विचार करतो कारण पुस्तकापेक्षा आज मोबाईल महत्त्वाचा वाटतो,मोबाईलही गरजेचा आहे परंतु शंभर/दोनशे रुपयाचे पुस्तक आपल्या मुलांच्या आयुष्यातील  एक वेगळे वळण ठरु शकते याचा आपल्याला विसर पडतो,याप्रसंगी जुन्नरचे आमदार अतुल बेनके,रामभाऊ बोरचटे,निलेश धानापुणे,धोंडिभाऊ पिंगट, विश्वनाथ डावखर, सरपंच गोरक्षनाथ वाघ,राजेंद्र गाडगे,सारिका घळसासी,सचिन घोडेस्वार आदी मान्यवर उपस्थित होते.             

Comments

Popular posts from this blog

ग्रामीण विद्यार्थ्यांना वरदान ठरतेय बेल्हे येथील समर्थ शैक्षणिक संकुल.

बेल्हे(जुन्नरवार्ता सुधाकर सैद)   येथील समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे (बांगरवाडी) येथील इंजिनिअरिंग,डिप्लोमा,बी सी एस या महाविद्यालयातील ४० विद्यार्थ्यांची विविध नामांकित व बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड झाल्याची माहिती संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके यांनी दिली. ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागाच्या वतीने घेतल्या गेलेल्या कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये अभियांत्रिकी विभागातील १३ विद्यार्थ्यांची,पॉलिटेक्निक मधील २३ तर बी सी एस मधील ४ विद्यार्थ्यांची विविध नामांकित व बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड झाली. समर्थ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभाग आशिष फुलवडे-रिव्हेचर या कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून ५ लाखाचे पॅकेज,शितल पाचारणे या विद्यार्थिनीची पुणे येथील व्हर्च्युसा कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून निवड झाली.त्यामध्ये तिला *४.५ लाखाचे पॅकेज मिळाले, सिद्धेश साळुंके-अकसेंचर या कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून ४.५ लाखाचे पॅकेज,दिपक गाढवे -बजाज फायनान्स मध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून ३ लाखाचे पॅकेज,प्रकाश नवले या विद्यार्थ्याची...

नटरंगी नार सुरेखा पुणेकरांच्या अदाकारीने प्रेक्षक मंत्रमुग्ध

बेल्हे(वार्ताहर) कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षापासून तमाशा फडांचे मालक व कलाकार देशोधडीला लागले असून प्रशासनाने बंदी ऊठविल्यानंतर(दि.२६/२७ नोव्हेंबर)  बेल्हे येथे कै. संगितरत्न दत्ता महाडिक पुणेकर तमाशा महोत्सवाच्या माध्यमातून साईकृपा पतसंस्थेचे अध्यक्ष वसंत जगताप व त्यांच्या सहका-यांनी त्यांना सावरण्यासाठी मदतीचा हात पुढे केला व दोन दिवस आठ तमाशा फड मालकांनी आपली कला सादर केली व दुसऱ्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रासह परदेशातही आपल्या लावणीच्या माध्यमातून मराठी ठसक्याचा ठसा उमटवणारी,आपल्या अदाकारीने भल्याभल्यांच्या टोप्या उडवणारी लावणीसम्राज्ञी नटरंगी नार सुरेखा पुणेकर यांच्या बहारदार लावणीचा आस्वाद घेण्यासाठी बेल्हेकरांसह पुणे,अहमदनगर,मुंबईवरुन खास ढोलकीच्या तालावर आणि घुंगराच्या बोलावर रंगलेली लावणी पाहण्यासाठी रसिक व दर्दी प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.श्री बेल्हेश्वर यात्रेच्या निमित्ताने भरणा-या तमाशा महोत्सवाचा दुसरा दिवस हा पुणेकर यांच्या लावणीमुळे चांगलाच बहरला होता.कार्यक्रमाची सुरूवात झाल्यावर पुणेकर यांच्या बैठकीच्या लावणीला त्यांनी केलेल्य...

समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्सला महाराष्ट्र शासनाची मान्यता

*समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्सला महाराष्ट्र शासनाची मान्यता प्राप्त* समर्थ रूरल एजुकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ शैक्षणिक संकुलमध्ये शैक्षणिक वर्ष २०२१-२२ पासून महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या अखत्यारीत असलेला व्यवसायाभिमुख पदवीचा अभ्यासक्रम ए डी एम एल टी म्हणजेच ऍडव्हान्स डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी हा सुरू करण्यास महाराष्ट्र शासनाने नुकतीच मान्यता प्रदान केली असल्याची माहिती संस्थेचे सचिव विवेक शेळके यांनी दिली. सदर अभ्यासक्रम महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मान्यता प्राप्त उत्तर पुणे जिल्ह्यातील एकमेव असणार आहे.या अभ्यासक्रमाची प्रवेश पात्रता बी एस्सी केमिस्ट्री,झुलॉजी,बॉटनी,(गणित व भौतिकशास्त्र सोडून बाकीचे),बी एस्सी फिजिओथेरपी,बी फार्मसी,बी व्ही एस्सी सी,बी ए एम एस,बी यु एम एस,एम बी बी एस,डी एच एम एस किंवा समकक्ष अभ्यासक्रम पूर्ण केलेले विद्यार्थी या अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ शकतात.हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर रक्त,लघवी तपासणी प्रयोगशाळा सुरू करण्यासाठी नोंदणीकृत परवाना प्राप्त होतो.प्रयोगशाळा पर्यवेक्षक,सहाय्यक,तंत्रज्ञ म्हणून काम करण...