Skip to main content

डाॕ.ए पी जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस-वाचन प्रेरणा दिन


बेल्हे(जुन्नरवार्ता सुधाकर सैद)  समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट राजुरी संचलित बेल्हे येथील शैक्षणिक संकुलात १५ ऑक्टोबर डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात आला.
संस्थेचे सचिव विवेक शेळके यांच्या शुभहस्ते डॉ.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,अभियांत्रिकी चे प्राचार्य डॉ.अनिल पाटील,एम बी ए चे प्राचार्य राजीव सावंत,बी सी एस चे प्राचार्य डॉ.लक्ष्मण घोलप,पॉलिटेक्निक चे प्राचार्य अनिल कपिले,फार्मसी चे प्राचार्य डॉ.संतोष घुले,डॉ.सुभाष कुंभार,गुरुकुल चे प्राचार्य सतीश कुऱ्हे,प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर,प्रा.प्रवीण सातपुते,प्रा.अमोल खतोडे,प्रा.निर्मल कोठारी,प्रा.भूषण बोऱ्हाडे आदी उपस्थित होते.
ग्रंथालयातील पुस्तके,साहित्य,वाड्मय यांचे ऑनलाईन प्रदर्शन भरविण्यात आले होते.
यावेळी डॉ.लक्ष्मण घोलप म्हणाले की विद्यार्थ्यांनी महत्वाकांक्षी असणे गरजेचे आहे.एक वेळ अपयश आले तरी चालेल.वाचनाची आवड हि सवड काढून जोपासावी लागते.व्यायाम हे शरीर आणि मेंदू दोन्हींचा मेळ घालून प्रगल्भता मिळवण्याचे साधन आहे.वाचाल तर वाचाल या उक्तीप्रमाणे कुठल्याही क्षेत्रात यश संपादन करणेसाठी वाचन हे महत्वाचे आहेच.वाचनाने आकलन शक्ती,धारणक्षमता आदींमध्ये वाढ होते.
वाचनासाठी सर्व विद्यार्थ्यांना प्रेरित करून त्यांना त्यांचे इप्सित ध्येयपूर्तीसाठी मदत करणे हा या वाचन प्रेरणा दिनाचा हेतू असल्याचे डॉ.अनिल पाटील यांनी स्पष्ट केले.
कुशाग्र बुद्धिमत्ता,प्रखर तेज आणि वाणीवर प्रभुत्व केवळ वाचनानेच शक्य असल्याचे फार्मसी चे प्राचार्य डॉ.संतोष घुले यांनी सांगितले.
वाचनाने अनेक प्रश्नांची गूढ समजते.किंबहुना प्रत्येक गोष्टीची साध्यर्म कळते.तसेच वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने वाचन संस्कृती संवर्धनासाठी व जोपासण्यासाठी नो गॅझेट डे,निरंतन वाचन,पुस्तक भेट,ऑनलाईन ई बुक्स चे वाचन इ.अनेकविध उपक्रमांचे आयोजन ऑनलाईन वेबिनार द्वारे संकुलात करण्यात आले होते.
समर्थ संकुलात ग्रंथालय विभागाच्या वतीने ग्रंथपाल प्रा.गणेश नवले यांनी ऑनलाईन वाचन स्पर्धा,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी ऑनलाईन प्रश्नमंजुषा इ.कार्यक्रमांचे आयोजन केले होते.

Comments

Popular posts from this blog

ग्रामीण विद्यार्थ्यांना वरदान ठरतेय बेल्हे येथील समर्थ शैक्षणिक संकुल.

बेल्हे(जुन्नरवार्ता सुधाकर सैद)   येथील समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे (बांगरवाडी) येथील इंजिनिअरिंग,डिप्लोमा,बी सी एस या महाविद्यालयातील ४० विद्यार्थ्यांची विविध नामांकित व बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड झाल्याची माहिती संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके यांनी दिली. ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागाच्या वतीने घेतल्या गेलेल्या कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये अभियांत्रिकी विभागातील १३ विद्यार्थ्यांची,पॉलिटेक्निक मधील २३ तर बी सी एस मधील ४ विद्यार्थ्यांची विविध नामांकित व बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड झाली. समर्थ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभाग आशिष फुलवडे-रिव्हेचर या कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून ५ लाखाचे पॅकेज,शितल पाचारणे या विद्यार्थिनीची पुणे येथील व्हर्च्युसा कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून निवड झाली.त्यामध्ये तिला *४.५ लाखाचे पॅकेज मिळाले, सिद्धेश साळुंके-अकसेंचर या कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून ४.५ लाखाचे पॅकेज,दिपक गाढवे -बजाज फायनान्स मध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून ३ लाखाचे पॅकेज,प्रकाश नवले या विद्यार्थ्याची पुणे येथ

शेळके कुटूंबाने जपला ऐक्याचा वसा आणि वारसा

बेल्हे(वार्ताहर)  समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष वसंतराव शेळके,राजुरी गावचे माजी सरपंच व विद्यमान उपसरपंच माऊली शेळके,जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या स्नेहल शेळके व शेळके परिवाराच्या वतीने मुस्लिम बांधवांसाठी दिवाळी फराळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते,या कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव व गावातील सर्व प्रमुख संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.प्रत्येकवर्षी दिवाळीच्या सणाला सर्व मुस्लिम बांधवांना बोलावून दिवाळी फराळ कार्यक्रमाचे आयोजन त्याचबरोबर प्रमुख मान्यवरांचा सत्कार असे या कार्यक्रमाचे स्वरूप असून राजुरी या गावाला एक ऐतिहासिक अशी वैचारिक बैठक आहे व ती जपण्याचा,जोपासण्याचा आणि प्रचार व प्रसार करण्याचा प्रयत्न हिंदू मुस्लिम या बांधवांना एकत्रित घेऊन या दिवाळी फराळाच्या निमित्ताने शेळके कुटुंबियांमार्फत दरवर्षी केला जातो. युवा नेतृत्व वल्लभ शेळके यांच्या पुढाकाराने साजरा होत असलेला दिवाळी फराळाचा कार्यक्रम म्हणजे खमंग विचारांचा खरपुस नजराणा असून खऱ्या अर्थाने हिंदू मुस्लिम बांधवांचे पूर्वापारपासूनचे एकोप्याचे दर्शन घडवतो तसेच राजुरी गावच्या जडण-घडणी मध्ये श

ऊस ट्रॕक्टर ट्राॕलीला चारचाकीची मागून धडक एक ठार दोन गंभीर

बेल्हे(वार्ताहर) कल्याण-अहमदनगर महामार्गावर गुळूंचवाडी गावच्या हद्दीत उसाच्या ट्रॉलीला इनोव्हा कारने पाठीमागून भरधाव वेगाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार झाला तर दोघे गंभीर जखमी झाले असून हे सर्व जण नगरकडून आळेफाटा येथे जात असताना शुक्रवारी (दि.१९) रात्री आठ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला असून संजय मारुती गगे( रा.नळवणे,ता.जुन्नर) असे अपघातात ठार झालेल्याचे नाव असून योगेश धोंडिबा आहेर, संदीप पोपट शिंदे हे गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत आळेफाटा पोलिसांनी दिलेली अधिकची माहिती अशी की कल्याण-अहमदनगर  महामार्गावर गुळंचवाडी शिवारातून क्रांती शुगर फॅक्टरीकडे जात असलेला ट्रॅक्टर क्रमांक (एम.एच १६ केव्ही ६४८६ ) नंबर नसलेल्या व उसाने भरलेल्या दोन ट्रॉली घेऊन जात होता,त्याच दरम्यान भरधाव वेगाने आळेफाट्याकडे जाणारी इनोव्हा चारचाकी ( एमएच-१९-एपी-८०१०)ट्रॉलीच्या पाठीमागून जाऊन धडकली व जोरदार धडक बसल्याने इनोव्हा चारचाकीचे डाव्या बाजुचे जास्त नुकसान झाले असून धडक इतकी जोराची होती की इनोव्हामधील संजय मारुती गगे जागीच ठार झाले व उर्वरित दोन जखमींना आळेफाटा येथील खाजगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी द