Skip to main content

बेल्हे ग्रामसभेत अभूतपूर्व गोंधळ,पोलीसांचा हस्तक्षेप,ग्रामसभा बरखास्त

बेल्हे(वार्ताहर) कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जवळपास दीड वर्षानंतर प्रशासनाने दिलेल्या परवानगीने बेल्हे येथील ग्रामसभेला उस्फुर्त अशी गर्दी झाली होती व गर्दी होणार याचा अंदाज आल्यानेच ग्रामसभा ग्रामपंचायत सभागृहाऐवजी मुक्ताई मंदिराच्या सभामंडपात शुक्रवारी(दि.२९) घेण्यात आली.या ग्रामसभेत गावातील शिवसेनेसह राष्ट्रवादीच्या दोन गटामध्येच ग्रामसचिवालय कोणत्या जागेत बांधायचे यावरुन वाद झाले व हा वाद इतका टोकाला गेला की अखेर पोलीसांना त्यामध्ये हस्तक्षेप करावा लागला व या सर्व वादावादी व गोंधळामुळे सरपंच गोरक्षनाथ वाघ यांना ग्रामसभा बरखास्त करावी लागली.याविषयी अधिक माहिती अशी की ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब बेंद्रे यांनी ग्रामपंचायतीचा सर्व लेखाजोखा तसेच सरकारी निमसरकारी योजनांची माहिती ग्रामसभेला दिल्यानंतर ग्रामस्थांना घरपट्टी व पाणीपट्टी भरण्याचे आवाहन केले आजच्या घडीला ग्रामपंचायतीकडे कर्मचाऱ्यांना पगार करण्याइतकाही फंड उपलब्ध नाही ही वस्तु सांगितली.पंचायत समिती सदस्या अनघा घोडके यांनी चर्चेत भाग घेताना असे सुचविले कि आपणाकडे स्वमालकीची बारा गुंठे एवढी मोठी जागा असताना जिल्हा परिषद देत असलेल्या सहा गुंठ्यात आपण इमारत का बांधावी तसेच बेल्हे-जेजुरी महामार्गाचा विचार करुनच इमारत बांधावी कारण राज्य महामार्गाच्या रस्त्याच्या मध्यापासून दोन्हीही बाजुला वीस मिटर जागा ठेवावी लागते त्यामुळे जिल्हा परिषदेच्या सहा गुंठे जागेचा प्रस्ताव अयोग्य आहे तसेच ग्रामसचिवालय बांधताना नागरिकांना एकाच छताखाली बँक, महसूल कार्यालय,पोष्ट,वाचनालय,ग्रामपंचायत कार्यालय, सभागृह,अभ्यागत कक्ष,वाहन पार्कींग इत्यादी सुविधा देता येतील व त्याठिकाणी अग्निशमन यंत्रणाही सुलभतेने वापरता येईल अशा ठिकाणी ग्रामसचिवालय बांधावे यावरुन शिवसेना,राष्ट्रवादीचा एक गट व राष्ट्रवादीचा दुसरा गट यामध्ये वादावादी चालू झाली त्याचे पर्यावसान एकमेकांच्या अंगावर धाऊन जाण्यात झाल्याने एक अभूतपूर्व गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली व ती हाताबाहेर जाऊ नये या हेतूने पोलीसांना  यामध्ये हस्तक्षेप करावा लागला.यावेळी गावातील पुढारी  मंडळींनी नवीन ग्रामसचिवालय बांधण्यासाठी श्रेयवादाची लढाई थांबवावी व या श्रेयवादाच्या लढाईत गावाचे नुकसान होत असून,श्रेयवाद सोडून गावाच्या विकासासाठी एकत्र येण्याचे आवाहन करताना ग्रामसचिवालयासाठी गावाचे मतदान घ्या व गाव ठरविल तेच होईल' असे स्पष्ट मत श्री मुक्ताबाई देवस्थान जीर्णोद्धार समितीचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते जानकू डावखर यांनी व्यक्त केले व या सर्व गोंधळात सरपंच गोरक्षनाथ वाघ यांनी ग्रामसभा बरखास्त केल्याचे जाहीर केले.या सर्व गोंधळामुळे गावातील पाणीप्रश्न,गटारे,रस्ते, वीज,अतिक्रमणे,दिव्यांग व्यक्ति,रेशनिंग,विद्यार्थ्यांसाठी मैदान, स्मशानभूमीतील महिलांसाठी स्वच्छतागृहे, घरकुले, ग्रामपंचायतीचे व्यवसायिक गाळे,सार्वजनिक स्वच्छतागृहे बांधणे व इतरही अनेक आवश्यक प्रश्नावर चर्चा न झाल्याने ते जसे आहेत,जेथे आहेत तसेच राहिल्याने ग्रामसभेला आलेल्या ग्रामस्थांची घोर निराशा झाली.यावेळी मनोहर पिंगट यांनी आज राजाभाऊ गुंजाळ हयात असते तर ग्रामसभेत अशी वादावादी कोणीही केली असती का असा प्रश्न विचारला असता यावर सर्वांनीच मौन बाळगले.यावेळी झालेल्या चर्चेत सरपंच गोरक्षनाथ वाघ,उपसरपंच निलेश कणसे,माजी सरपंच पाराजी बोरचटे,विश्वनाथ डावखर,जाफर पठाण,पोलीसपाटील बाळासाहेब शिरतर,निलेश पिंगट, सामाजिक कार्यकर्ते अशोक घोडके,शंकर शिंदे,दत्ता खोमणे, शिवसेना शाखाप्रमुख राजेंद्र गफले,मोहन मटाले,प्रदिप पिंगट,गणेश चोरे इत्यादिंनी भाग घेतला.
              

Comments

Popular posts from this blog

ग्रामीण विद्यार्थ्यांना वरदान ठरतेय बेल्हे येथील समर्थ शैक्षणिक संकुल.

बेल्हे(जुन्नरवार्ता सुधाकर सैद)   येथील समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे (बांगरवाडी) येथील इंजिनिअरिंग,डिप्लोमा,बी सी एस या महाविद्यालयातील ४० विद्यार्थ्यांची विविध नामांकित व बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड झाल्याची माहिती संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके यांनी दिली. ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागाच्या वतीने घेतल्या गेलेल्या कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये अभियांत्रिकी विभागातील १३ विद्यार्थ्यांची,पॉलिटेक्निक मधील २३ तर बी सी एस मधील ४ विद्यार्थ्यांची विविध नामांकित व बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड झाली. समर्थ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभाग आशिष फुलवडे-रिव्हेचर या कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून ५ लाखाचे पॅकेज,शितल पाचारणे या विद्यार्थिनीची पुणे येथील व्हर्च्युसा कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून निवड झाली.त्यामध्ये तिला *४.५ लाखाचे पॅकेज मिळाले, सिद्धेश साळुंके-अकसेंचर या कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून ४.५ लाखाचे पॅकेज,दिपक गाढवे -बजाज फायनान्स मध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून ३ लाखाचे पॅकेज,प्रकाश नवले या विद्यार्थ्याची...

नटरंगी नार सुरेखा पुणेकरांच्या अदाकारीने प्रेक्षक मंत्रमुग्ध

बेल्हे(वार्ताहर) कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षापासून तमाशा फडांचे मालक व कलाकार देशोधडीला लागले असून प्रशासनाने बंदी ऊठविल्यानंतर(दि.२६/२७ नोव्हेंबर)  बेल्हे येथे कै. संगितरत्न दत्ता महाडिक पुणेकर तमाशा महोत्सवाच्या माध्यमातून साईकृपा पतसंस्थेचे अध्यक्ष वसंत जगताप व त्यांच्या सहका-यांनी त्यांना सावरण्यासाठी मदतीचा हात पुढे केला व दोन दिवस आठ तमाशा फड मालकांनी आपली कला सादर केली व दुसऱ्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रासह परदेशातही आपल्या लावणीच्या माध्यमातून मराठी ठसक्याचा ठसा उमटवणारी,आपल्या अदाकारीने भल्याभल्यांच्या टोप्या उडवणारी लावणीसम्राज्ञी नटरंगी नार सुरेखा पुणेकर यांच्या बहारदार लावणीचा आस्वाद घेण्यासाठी बेल्हेकरांसह पुणे,अहमदनगर,मुंबईवरुन खास ढोलकीच्या तालावर आणि घुंगराच्या बोलावर रंगलेली लावणी पाहण्यासाठी रसिक व दर्दी प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.श्री बेल्हेश्वर यात्रेच्या निमित्ताने भरणा-या तमाशा महोत्सवाचा दुसरा दिवस हा पुणेकर यांच्या लावणीमुळे चांगलाच बहरला होता.कार्यक्रमाची सुरूवात झाल्यावर पुणेकर यांच्या बैठकीच्या लावणीला त्यांनी केलेल्य...

समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्सला महाराष्ट्र शासनाची मान्यता

*समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्सला महाराष्ट्र शासनाची मान्यता प्राप्त* समर्थ रूरल एजुकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ शैक्षणिक संकुलमध्ये शैक्षणिक वर्ष २०२१-२२ पासून महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या अखत्यारीत असलेला व्यवसायाभिमुख पदवीचा अभ्यासक्रम ए डी एम एल टी म्हणजेच ऍडव्हान्स डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी हा सुरू करण्यास महाराष्ट्र शासनाने नुकतीच मान्यता प्रदान केली असल्याची माहिती संस्थेचे सचिव विवेक शेळके यांनी दिली. सदर अभ्यासक्रम महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मान्यता प्राप्त उत्तर पुणे जिल्ह्यातील एकमेव असणार आहे.या अभ्यासक्रमाची प्रवेश पात्रता बी एस्सी केमिस्ट्री,झुलॉजी,बॉटनी,(गणित व भौतिकशास्त्र सोडून बाकीचे),बी एस्सी फिजिओथेरपी,बी फार्मसी,बी व्ही एस्सी सी,बी ए एम एस,बी यु एम एस,एम बी बी एस,डी एच एम एस किंवा समकक्ष अभ्यासक्रम पूर्ण केलेले विद्यार्थी या अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ शकतात.हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर रक्त,लघवी तपासणी प्रयोगशाळा सुरू करण्यासाठी नोंदणीकृत परवाना प्राप्त होतो.प्रयोगशाळा पर्यवेक्षक,सहाय्यक,तंत्रज्ञ म्हणून काम करण...