बेल्हे(वार्ताहर) कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जवळपास दीड वर्षानंतर प्रशासनाने दिलेल्या परवानगीने बेल्हे येथील ग्रामसभेला उस्फुर्त अशी गर्दी झाली होती व गर्दी होणार याचा अंदाज आल्यानेच ग्रामसभा ग्रामपंचायत सभागृहाऐवजी मुक्ताई मंदिराच्या सभामंडपात शुक्रवारी(दि.२९) घेण्यात आली.या ग्रामसभेत गावातील शिवसेनेसह राष्ट्रवादीच्या दोन गटामध्येच ग्रामसचिवालय कोणत्या जागेत बांधायचे यावरुन वाद झाले व हा वाद इतका टोकाला गेला की अखेर पोलीसांना त्यामध्ये हस्तक्षेप करावा लागला व या सर्व वादावादी व गोंधळामुळे सरपंच गोरक्षनाथ वाघ यांना ग्रामसभा बरखास्त करावी लागली.याविषयी अधिक माहिती अशी की ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब बेंद्रे यांनी ग्रामपंचायतीचा सर्व लेखाजोखा तसेच सरकारी निमसरकारी योजनांची माहिती ग्रामसभेला दिल्यानंतर ग्रामस्थांना घरपट्टी व पाणीपट्टी भरण्याचे आवाहन केले आजच्या घडीला ग्रामपंचायतीकडे कर्मचाऱ्यांना पगार करण्याइतकाही फंड उपलब्ध नाही ही वस्तु सांगितली.पंचायत समिती सदस्या अनघा घोडके यांनी चर्चेत भाग घेताना असे सुचविले कि आपणाकडे स्वमालकीची बारा गुंठे एवढी मोठी जागा असताना जिल्हा परिषद देत असलेल्या सहा गुंठ्यात आपण इमारत का बांधावी तसेच बेल्हे-जेजुरी महामार्गाचा विचार करुनच इमारत बांधावी कारण राज्य महामार्गाच्या रस्त्याच्या मध्यापासून दोन्हीही बाजुला वीस मिटर जागा ठेवावी लागते त्यामुळे जिल्हा परिषदेच्या सहा गुंठे जागेचा प्रस्ताव अयोग्य आहे तसेच ग्रामसचिवालय बांधताना नागरिकांना एकाच छताखाली बँक, महसूल कार्यालय,पोष्ट,वाचनालय,ग्रामपंचायत कार्यालय, सभागृह,अभ्यागत कक्ष,वाहन पार्कींग इत्यादी सुविधा देता येतील व त्याठिकाणी अग्निशमन यंत्रणाही सुलभतेने वापरता येईल अशा ठिकाणी ग्रामसचिवालय बांधावे यावरुन शिवसेना,राष्ट्रवादीचा एक गट व राष्ट्रवादीचा दुसरा गट यामध्ये वादावादी चालू झाली त्याचे पर्यावसान एकमेकांच्या अंगावर धाऊन जाण्यात झाल्याने एक अभूतपूर्व गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली व ती हाताबाहेर जाऊ नये या हेतूने पोलीसांना यामध्ये हस्तक्षेप करावा लागला.यावेळी गावातील पुढारी मंडळींनी नवीन ग्रामसचिवालय बांधण्यासाठी श्रेयवादाची लढाई थांबवावी व या श्रेयवादाच्या लढाईत गावाचे नुकसान होत असून,श्रेयवाद सोडून गावाच्या विकासासाठी एकत्र येण्याचे आवाहन करताना ग्रामसचिवालयासाठी गावाचे मतदान घ्या व गाव ठरविल तेच होईल' असे स्पष्ट मत श्री मुक्ताबाई देवस्थान जीर्णोद्धार समितीचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते जानकू डावखर यांनी व्यक्त केले व या सर्व गोंधळात सरपंच गोरक्षनाथ वाघ यांनी ग्रामसभा बरखास्त केल्याचे जाहीर केले.या सर्व गोंधळामुळे गावातील पाणीप्रश्न,गटारे,रस्ते, वीज,अतिक्रमणे,दिव्यांग व्यक्ति,रेशनिंग,विद्यार्थ्यांसाठी मैदान, स्मशानभूमीतील महिलांसाठी स्वच्छतागृहे, घरकुले, ग्रामपंचायतीचे व्यवसायिक गाळे,सार्वजनिक स्वच्छतागृहे बांधणे व इतरही अनेक आवश्यक प्रश्नावर चर्चा न झाल्याने ते जसे आहेत,जेथे आहेत तसेच राहिल्याने ग्रामसभेला आलेल्या ग्रामस्थांची घोर निराशा झाली.यावेळी मनोहर पिंगट यांनी आज राजाभाऊ गुंजाळ हयात असते तर ग्रामसभेत अशी वादावादी कोणीही केली असती का असा प्रश्न विचारला असता यावर सर्वांनीच मौन बाळगले.यावेळी झालेल्या चर्चेत सरपंच गोरक्षनाथ वाघ,उपसरपंच निलेश कणसे,माजी सरपंच पाराजी बोरचटे,विश्वनाथ डावखर,जाफर पठाण,पोलीसपाटील बाळासाहेब शिरतर,निलेश पिंगट, सामाजिक कार्यकर्ते अशोक घोडके,शंकर शिंदे,दत्ता खोमणे, शिवसेना शाखाप्रमुख राजेंद्र गफले,मोहन मटाले,प्रदिप पिंगट,गणेश चोरे इत्यादिंनी भाग घेतला.
बेल्हे(जुन्नरवार्ता सुधाकर सैद) येथील समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे (बांगरवाडी) येथील इंजिनिअरिंग,डिप्लोमा,बी सी एस या महाविद्यालयातील ४० विद्यार्थ्यांची विविध नामांकित व बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड झाल्याची माहिती संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके यांनी दिली. ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागाच्या वतीने घेतल्या गेलेल्या कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये अभियांत्रिकी विभागातील १३ विद्यार्थ्यांची,पॉलिटेक्निक मधील २३ तर बी सी एस मधील ४ विद्यार्थ्यांची विविध नामांकित व बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड झाली. समर्थ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभाग आशिष फुलवडे-रिव्हेचर या कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून ५ लाखाचे पॅकेज,शितल पाचारणे या विद्यार्थिनीची पुणे येथील व्हर्च्युसा कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून निवड झाली.त्यामध्ये तिला *४.५ लाखाचे पॅकेज मिळाले, सिद्धेश साळुंके-अकसेंचर या कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून ४.५ लाखाचे पॅकेज,दिपक गाढवे -बजाज फायनान्स मध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून ३ लाखाचे पॅकेज,प्रकाश नवले या विद्यार्थ्याची पुणे येथ
Comments
Post a Comment