बेल्हे(वार्ताहर) जुन्नरचे कर्तव्यदक्ष युवा आमदार अतुल बेनके यांच्या उपस्थितीत मंगळवार दिनांक ९/११/२९२१ रोजी संध्याकाळी पाच वाजता बेल्हे येथे झालेल्या जुन्नर तालुका प्रिमिअर क्रिकेट लीगच्या आमदार चषक स्पर्धेच्या समारोपाच्या कार्यक्रमाच्या वेळी राष्ट्रवादीच्या गटतटाचे राजकारण पाहावयास मिळाले.पुणे, अहमदनगर,नाशिक या व ईतरही अनेक ठिकाणाहून क्रिकेट रसिकांनी हजेरी लावली परंतु या गटातील जिल्हा परिषद सदस्य व त्यांच्या समर्थकांनी दस्तुखुद्द आमदारांच्या कार्यक्रमाला पाठ दाखविली,तसेच यावेळी झालेल्या स्पर्धेच्या कार्यक्रम पत्रिकेत दुसऱ्या गटांची नावे नसल्याने ऐन दिवाळीत राष्ट्रवादीच्या दुफळीचे फटाके ऐकावयास मिळाले असून त्याचा परिणाम आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळाचे काटे गटबाजीमुळे बिघडण्याची शक्यता नाकारता येणार नाही तसेच या गटबाजीचा फटका विद्यमान आमदारांनाही बसणार असल्याची चर्चा जिल्हापरिषद गटात ऐकायला येत आहे.गेल्या आठ ते दहा वर्षापासून निमगावसावा (ता.जुन्नर ) येथे आमदार चषक क्रिकेट स्पर्धा अतिशय भव्यदिव्य स्वरुपात भरविल्या जात होत्या परंतु यावर्षी माशी कुठे शिंकली कोण जाणे स्पर्धा रद्द झाल्या व अगदी थोड्याच अवधीत बेल्हे येथील आमदारांचे खंदे समर्थक अतुल भांबेरे व बेल्हेचे सरपंच गोरक्षनाथ वाघ यांनी आमदार चषक स्पर्धा यशस्वी करुन दाखवली व मिळालेला प्रेक्षकांच्या प्रतिसादाच्या गर्दीमुळे भांबेरे यांच्या आशेला जिल्हा परिषदेचे धुमारे फुटू लागले आहेत व यातुनच अतुल भांबेरे यांच्या राजकीय कारकिर्दीस चारचांद लागणार असल्याचे दिसून आले परंतु जिल्हा परिषद गटातील सर्वांना बरोबर घेऊन चालण्याची मोठी तारेवरची कसरत भांबेरे यांना करावी लागणार आहे तसेच समर्थचे राजकारणही अजून गुलदस्त्यात असून त्यांना माननारा एक मोठा वर्ग या गटात असून आरक्षणानंतरच समर्थवाले आपला पत्ता उघड करणार असल्याचे समजते आणि नव्यानेच भाजपात गेलेल्या आशा समर्थकांनीही या गटात ब-यापैकी हातपाय पसरल्याने येणारी जिल्हा परिषद निवडणूक कोणत्याही पक्षाला सहजसाध्य होणार नसून शिवसेना,राष्ट्रवादी यामध्येच खरी लढत होणार असून नव्यानेच तालुक्यात हातपाय पसरलेल्या कमळाबाईंची गोळाबेरीज किती होते यावरच ईतर दोघांची परिक्षा अवलंबून आहे,राष्ट्रवादीच्या दोन गटांना विद्यमान आमदारांनी येनकेन प्रकारे चुचकारुन सावरुन घेतले नाही तर आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीच्या घड्याळाचे काटे गटबाजीमुळे बिघडले जातील व जिल्हा परिषद गटात परत समर्थचा बोलबाला होणार असल्याची शक्यता राजकीय वर्तुळामध्ये वर्तवली जात आहे.
बेल्हे(जुन्नरवार्ता सुधाकर सैद) येथील समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे (बांगरवाडी) येथील इंजिनिअरिंग,डिप्लोमा,बी सी एस या महाविद्यालयातील ४० विद्यार्थ्यांची विविध नामांकित व बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड झाल्याची माहिती संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके यांनी दिली. ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागाच्या वतीने घेतल्या गेलेल्या कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये अभियांत्रिकी विभागातील १३ विद्यार्थ्यांची,पॉलिटेक्निक मधील २३ तर बी सी एस मधील ४ विद्यार्थ्यांची विविध नामांकित व बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड झाली. समर्थ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभाग आशिष फुलवडे-रिव्हेचर या कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून ५ लाखाचे पॅकेज,शितल पाचारणे या विद्यार्थिनीची पुणे येथील व्हर्च्युसा कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून निवड झाली.त्यामध्ये तिला *४.५ लाखाचे पॅकेज मिळाले, सिद्धेश साळुंके-अकसेंचर या कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून ४.५ लाखाचे पॅकेज,दिपक गाढवे -बजाज फायनान्स मध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून ३ लाखाचे पॅकेज,प्रकाश नवले या विद्यार्थ्याची पुणे येथ
Comments
Post a Comment